लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला ! संविधान पुढील शेकडो वर्षे अबाधित राहो !! -डॉ.भीमराव य. आंबेडकर
🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞 मुंबई /ठाणे - भारतीय संविधान सक्षम नसते, तर देशात बांगला देशासारखी अराजकता झाली असती. मागील दहा वर्षे आणि पुढील पाच वर्षे SC, ST साठी धोक्याची घंटा होती. परंतु संविधानाला न मानणारे सत्तेत आले. त्यांनी चारशे पार ची घोषणा करून, संविधान बदलण्याची भाषा केल्याने, SC, ST,बहुजनांच्या भावना दुखावल्या, संविधानाला खुले आम आव्हान दिले.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला, इंडिया गटबंधनचा नाही ! जे सत्तेत बसले आहेत, ते EVM च्या माध्यमातून बसले आहेत, जनतेच्या माध्यमातून नाही ! तर पाच कोटी मतांचा घोटाळा झाला आहे, असे सारांशाने प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांनी दि. 15/8/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर मुंबई आणि शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल), उल्हासनगर येथील भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा शाखेच्या 37 वा वर्धापन दि...