Monday, September 15, 2025

📰 बोधगया महाबोधि महाविहार, महू जन्मभूमि व नागपुर दीक्षाभूमि के प्रबंधन हेतु 17 सितम्बर को देशव्यापी जन आक्रोश आंदोलन


📰 बोधगया महाबोधि महाविहार, महू जन्मभूमि व नागपुर दीक्षाभूमि के प्रबंधन हेतु 17 सितम्बर को देशव्यापी जन आक्रोश आंदोलन


➡️ डॉ. भीमरावआंबेडकर के नेतृत्व में निकलेगा जन आक्रोश मोर्चा


मुंबई - महाबोधी महाविहार आंदोलन के प्रणेता भंते अनागारिक धम्मपालजी एवं पेरियार स्वामी जयंती और भय्यासाहेब आम्बेडकर स्मृतीदिन के उपलक्ष्य में  आंदोलन का टप्पा 2 नुसार पुन्ह डॉ बाबासाहेब आम्बेडकर द्वारा स्थापित  भारत के तमाम बौद्धोंकी मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ एवं तमाम बुद्ध आंबेडकर विचार धाराके समाज संघटन के माध्यम से बाबासाहेब आंबेडकर जी के पोते डॉ भीमराव य आम्बेडकर जी के नेतृत्व में दिनांक 17/9/2025 के जन आक्रोश आंदोलन मोर्चा तीन मांगो के लिए पूरे देशके मंत्रालय एवं जिलाअधिकारी कार्यालय पर आयोजन किया गया है l तीन मांगे निम्न नूसार है,

1)तथागत भगवान बुद्ध को बुद्धत्व का ज्ञान प्राप्त हुआ वह जागतिक बौद्धांका बोधगया महाविहार बोद्धोंको नियमन करणे को देणे के बजाय बोधगया मंदिर अधिनियम 1949 बिहार सरकार द्वारा पारित अधिनियम है, ये अधिनियम के अनुसार 9 सदस्य में बौद्ध केवल 4 सदस्य हैl ये बुद्धगया महाविहार के प्रबंधन के मामले में संविधानिक अधिकारों (अनुच्छेद 25 और 26) का उल्लंघन मानते हैं, बोधगया मंदिर अधिनियम 1949 पूरी तरह से संविधान के अनुच्छेद 13 के विरोधी है। इसलिए, अनुरोध करते हैं कि, बौद्धों को महाबोधी महाविहार के पूर्ण प्रबंधन का अधिकार सौंप दिजीए जिसमें भारतरत्न डॉ बाबासाहब अम्बेडकर जी के पौत्र तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया के ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.डॉ भीमराव यशवंतराव अम्बेडकर जी का होना अनिवार्य किजीऐ l

2)भारतरत्न डॉ बाबासाहब अम्बेडकर जी का भव्य स्मारक, उनके जन्म स्थल *महू* में निर्माण कर, मध्यप्रदेश सरकार के माध्यम से बहुत ही सराहणीय महान कार्य किया है l यह स्मारक का वर्तमान प्रबंधन बाबासाहेब के विचारधारा के विपरीत हो रहा है l वहां पर जयभीम की जगह, अन्य 

 घोषणा हो रही है l इस लिये वहां  देश विदेश से आने वाले लाखो भीम अनुयायी व्यथित है और उनका आक्रोश चरम सीमा पर पहुंच गया हैl उसके विरोध में लगातार आन्दोलन महु,  इंदौर तथा देशभर में चल रहा है. अत: हम आपके नेतृत्व में चल रहे मध्यप्रदेश सरकार से अनुरोध करते है की, महु जन्म स्थली के स्मारक का पूरा प्रबंधन समिती के संविधान नुसार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/डॉ भीमराव य आंबेडकर जी को सौंप कर भीम अनुयायीयों को न्याय प्रदान कर  महामंगल कार्य करें l

3)नागपूर दीक्षाभूमी का निर्माण करने का मूल शासकीय सम्मती पत्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जी ने डॉ. बाबासाहब अम्बेडकर जी के सुपुत्र तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया के द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतराव भीमराव अम्बेडकर जी के नाम से जारी किया था l लेकीन बाद में दीक्षाभूमी स्मारक निर्माण समिती ने दीक्षाभूमी पर असंवैधानिक रुप से कब्जा कर रखा हैl दीक्षाभूमि पर पार्किंग के नाम पर विद्रूपिकीकरण किया गया, उस के विरोध में संविधान चौक, नागपूर में और देशभर में भीमसैनिकोंद्वारा लगातार आन्दोलन चलाया जा रहा हैl अनुरोध करते है की, दीक्षाभूमी नागपूर का विद्रूपिकीकरण दूर कर , उसका पूरा प्रबंधन  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (डॉ बाबासाहब अम्बेडकर जी के पौत्र डॉ भीमराव यशवंतराव अम्बेडकर जी) को सौंपने का कुशल कर्म करें l

ये तीनों विषयोंमें सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ने अपने अपने राज्य सरकार द्वारा उचित कार्यवाही करके, आप हमारे अनूशासनप्रिय समाज को न्याय प्रदान करणे का कुशल कर्म करे ऐसा निवेदन तीनों राज्य के मुख्यमंत्री एवं राष्ट्रपती महोदया, पंतप्रधान यांना जिलाधिकारी द्वारा और ईमेल द्वारा देणे वाले हैl 



(एड एस के भंडारे )

ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष, 

केंद्रीय कार्यालय प्रमुख 

समता सैनिक दल 

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

Sunday, September 14, 2025

📰 विशेष वार्ता | आक्रोश आंदोलन – १७ सप्टेंबर २०२५


📰 विशेष वार्ता | आक्रोश आंदोलन – १७ सप्टेंबर २०२५

मुंबई :
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, बौद्ध भिक्खु संघ व विविध समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आक्रोश आंदोलन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब करणार आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस. के. भंडारे यांनी देशभरातील सर्व शाखा, मंडळे व संघटनांना व्यापक प्रमाणावर जनसहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.


आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :

1️⃣ महाबोधी महाविहार, बोधगया – संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाला द्यावे.
2️⃣ महू जन्मभूमी स्मारक – व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना सोपवावे.
3️⃣ नागपूर दीक्षाभूमी – विद्रुपीकरण थांबवून व्यवस्थापन बौद्ध समाजाला परत द्यावे.


आंदोलनाविषयी सूचना :

🔹 प्रत्येक शाखेने आपल्या लेटरहेडवरून स्थानिक बुद्ध विहार, मंडळ व संघटनांना अर्ज देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करावे.
🔹 ज्या जिल्ह्यात संस्थेचे ट्रस्टी, केंद्रीय किंवा राज्य पदाधिकारी आहेत, त्यांनी त्यांना आंदोलनासाठी आमंत्रित करावे.
🔹 आंदोलनाच्या प्रचारासाठी बॅनर व पंपलेट्स प्रत्येक शाखेने काढावेत.
🔹 आंदोलन स्थळी प्रत्येक शाखेने आपला स्वत:चा बॅनर घेऊन उपस्थित रहावे.
🔹 शाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, बौद्धाचार्य, सैनिक, उपासक-उपासिका यांनी स्वत:च्या खर्चाने बॅनर तयार करून लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


      

       आंदोलनासंदर्भात सर्वसाधारण सूचना :


✅ सहभागी होणाऱ्यांनी स्थानिक शाखेत नोंदणी करावी.
✅ आंदोलनात पांढरे कपडे प्रधान करून यावे.
✅ स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळावेत.
✅ आंदोलन पूर्णपणे शांततामय व शिस्तप्रिय पद्धतीने पार पाडावे.


आंदोलन सकाळी १० वाजता सुरू होऊन दुपारी १ वाजेपर्यंत चालणार आहे. बौद्ध समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी देशभरातून अनुयायी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, संघटना व शाखांनी तयारीला वेग दिला आहे.


✊ या आंदोलनातून बौद्ध समाजाला न्याय, संवैधानिक हक्क आणि ऐतिहासिक स्मारकांचे खरीखुरी जपणूक यासाठी एकजूट दाखविण्यात येणार आहे.

🙏 नमो बुद्धाय | जयभीम | जय संविधान 🙏




Monday, September 1, 2025

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन




आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी):

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. या मालिकेतील विशेष प्रवचन “विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध” या विषयावर दिनांक ३१ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी संपन्न झाले. प्रवचनकार म्हणून केंद्रीय शिक्षक व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय डॉ. राजेश पवार गुरूजी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी “विश्वगुरु कसा असावा?” या विषयावर सखोल विचार मांडले. सत्य, करुणा, अहिंसा, समता, विज्ञाननिष्ठ विचार, शांती व बंधुत्व हे विश्वगुरुचे गुण असल्याचे सांगून, भगवान बुद्ध हेच खरे विश्वगुरु आहेत, असा ठाम संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. भरत कडू तायडे यांनी भूषविले. सरचिटणीस आयु. काशिनाथ अनाजी ढोले यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशासाठी योगदान देणारे पदाधिकारी व कार्यकर्ते: संरक्षण सचिव : आयु. बाजीराव काशिनाथ चंद्रमोरे. प्रचार व पर्यटन सचिव : आयु. शाम पांडूरंग पगारे.कार्यालयीन सचिव : आयु. गजानन त्रंबक मेढे. हिशोब तपासनीस : आयु. उत्तम तुकाराम डावरे.विहार व्यवस्थापक : आयु. सुरेश दोंदे.संघटक: आयु. विलास बापूराव घोडेस्वार, आयु. सचिन आनंद हिरे, आयु. एल. जी. त्रिभुवन, आयु. देवराम निवृत्ती शिंदे, आयु. रामभाऊ लिंबाजी जोगदंड, आयु. अशोक शामसुंदर रोकडे, आयु. प्रमोद पोपट सोनावणे, आयु. अमित अशोक गायकवाड संघटीका: आयुनी. सुनिताताई जीवन तायडे, आयुनी. नेहाताई सूर्यकांत रामटेके, आयुनी. हर्षाताई विनोद जाधव

👉 आयुष्यमानिनी राजश्रीताई राजेंद्र कदम यांच्या कडून खीरदान करण्यात आले.विशेष उपस्थिती: आयुष्यमान उत्तम सोनवणे (ठाणे जिल्हा संस्कार सचिव)या प्रवचनास परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमामुळे वातावरण धम्ममय भावनेने भारावून गेले.

🙏 जय भीम – नमो बुद्धाय 🙏

📌 बॉक्स न्यूज : “विश्वगुरु कसा असावा?” – डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

१️⃣ सत्याचा उपदेशक – अनुभव, प्रज्ञा व सत्यावर आधारित ज्ञान देणारा. उदा. बुद्धांचे “आंधळा विश्वास ठेवू नका.”

२️⃣ करुणा व अहिंसेचा मार्गदर्शक – हिंसेने नव्हे तर मैत्रीने जिंकणारा. उदा. अंगुलीमालाचे परिवर्तन.

३️⃣ समानतेचा प्रवक्ता – जात, धर्म, लिंग यांवर भेदभाव न करणारा. उदा. स्त्रियांना संघात स्थान, शूद्रांना समता.

४️⃣ विज्ञान व तर्काचा आदर्श – अंधश्रद्धा टाळून तर्कशुद्ध विचार करणारा. उदा. कलाम सुत्त.

५️⃣ शांती व बंधुत्वाचा ध्वजवाहक – संघर्षावर मात करून शांततेचा मार्ग दाखवणारा. उदा. मेत्ता सुत्त – “सर्व प्राणी सुखी होवोत.”

६️⃣ आदर्श वर्तन असलेला – बोलण्यापेक्षा आचरणाने शिकवणारा. उदा. बुद्धांचा गृहत्याग.

७️⃣ जगाला एकत्र आणणारा – मानवजातीला एक कुटुंब मानणारा. उदा. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय.”



👉 त्यामुळे तथागत भगवान बुद्ध हेच खरे विश्व

गुरु आहेत.













ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...