Tuesday, December 10, 2024

बुद्धगया,महू जन्मभूमी, नागपूर दीक्षाभूमी या पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी व समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा देशव्यापी लढा उभारणार !

 


भारतीय  बौद्ध महासभेची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 महापरिनिर्वाण दिन अभिवादन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.


मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा ) राष्ट्रीय कार्यकारिणीची कामकाज वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई येथे ट्रस्टी/ राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 7/12/2024 रोजी संपन्न झाली. सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष /मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख अॅड. एस. के. भंडारे यांनी केले.या सभेत अध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर, डॉ हरीश रावलिया, ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे, अँड. एस. के. भंडारे यांनी मार्गदर्शन केले. मध्यप्रदेश( दक्षिण) उत्तर प्रदेश (पश्चिमांचल, पूर्वांचल, बुंदेलखंड ), छत्तीसगड,पश्चिम बंगाल,कर्नाटक ( उत्तर, दक्षिण),हरियाणा, दिल्ली प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, ग्रेटर हैद्राबाद ( तेलंगणा) इत्यादी प्रमुख राज्यांच्या अध्यक्ष / सरचिटणीस यांनी आपल्या राज्यातील प्रश्न, समस्या व भारतीय बौद्ध महासभेचे कार्य गतिमान कसे करता येईल, याबाबत विचार मांडले. यासभेत प्रथम मागील सभेचे इतिवृत्त अँड. एस. एस. वानखडे यांनी वाचन केले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रीय कोषाध्यक्ष व विद्यमान राष्ट्रीय सचिव राजेश पवार व तत्कालीन राष्ट्रीय महासचिव व विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जगदीश गवई यांनी आपल्या कार्यकाळाचे आर्थिक अहवालाचे वाचन केले व राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी .तेलतुंबडे यांनी सन 2022 ते 2024 च्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. यावेळी राज्य /प्रदेश शाखाने आपले हिशोब, कार्य अहवाल, सभासद अहवाल, पर्यटन जमा खर्च अहवाल इत्यादी माहितीच्या फाईल्स बी. एम. कांबळे यांच्याकडे सादर केल्या.या सभेत चर्चे अंती असे निर्णय घेण्यात आले की, बुद्धगया,महू जन्मभूमी, नागपूर दीक्षाभूमी या पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी व बौध्द समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यांसाठी  देशव्यापी लढा उभारणे, देशातील सर्व धर्माची स्थळाची सत्यता पडताळणी करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्माच्या प्रतिनिधीची समिती गठीत करून सर्वेक्षण करावे, संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्ताने देशभर संविधान जागर करणे,प्रत्येक शाखेच्या पर्यटन प्रचार विभागा अंतर्गत बौद्ध विवाह मंडळ निर्माण करणे, तसेच मीराताई,

जौंजाळे,रावलिया यांच्या महाराष्ट्र व इतर राज्यातील असलेल्या कार्यकारिणीचे एकत्रिकरण करणे, अँड. सुभाष जौंजाळे यांनी दि. 6/12/2024 रोजीच्या चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभेत घोषणा केल्यानुसार चंद्रबोधी पाटील यांच्यावर मीराताई आंबेडकर यांची बदनामी केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करणे,सभासद मोहीम, धम्म दिक्षा कार्यक्रम आणि संस्थेची 24 प्रकारचे शिबीरें राबविणे,डॉ बाबासाहेब यांची संस्था असल्यामुळे संस्थेच्या पदावरून गेले तरी, त्यांना त्यांचा आर्थिक अहवाल द्यावाच लागेल व काही अडचणी असतील तर केंद्रीय ऑडिट कमिटी मार्गदर्शन करेल,केंद्रीय शिक्षक यांना पंचशील पट्टी देणे इत्यादी. 

     या वार्षिक सभेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनुक्रमे अँड. डॉ जगदीश गवई,के पी सिंह हीतैषी व सुषमाताई पवार,राष्ट्रीय सचिव अनुक्रमे बी एच गायकवाड, अँड डॉ एस एस वानखडे , वसंत पराड,राजेश पवार, बी एम कांबळे व भिकाजी कांबळे,राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी. बी. तेलतुंबडे, केंद्रीय कार्यालय सचिव अशोक केदारे ; केंद्रीय सदस्य एम. डी. सरोदे, रागिणीताई पवार आणि केंद्रीय महिला विभाग, केंद्रीय प्रशिक्षण विभाग, केंद्रीय संरक्षण - समता सैनिक दल विभागाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य ( पुरुष व महिला), मुंबई प्रदेश ( पुरुष व महिला), मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली प्रदेश, छत्तीसगड, हरियाणाच्या,कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू, हैद्राबाद, पश्चिम बंगाल, उत्तराखंड इत्यादी राज्यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकारी देशभरातून मोठया संख्येने उपस्थित होते.

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिनी दि 5/12/2024  रोजी रात्री 12 वा आंबेडकर परिवार रमाताई आंबेडकर -तेलतुंबडे, दर्शना भीमराव आंबेडकर, मनीषा आनंदराज आंबेडकर, अमन आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थित सामूहिक वंदना घेण्यात आली व समता सैनिक दलाच्या वतीने अमन आंबेडकर व दलाचे स्टाफ ऑफिसर अँड एस के भंडारे यांनी पुष्प चक्र अर्पण करण्यात आले.सूत्रसंचालन राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांनी केले.

         दि 6/12/2024 रोजी सकाळी 8.30 वा अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचशील ध्वज अर्ध्यावर उतरून डॉ भीमराव य आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, अँड एस के भंडारे, भन्ते सुमेध व भिख्खु संघ,असि. स्टाफ ऑफिसर अशोक कदम व समता सैनिक दलाचे मेजर आणि त्यावरील अधिकारी यांनी मानवंदना दिली. 

      डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर पश्चिम, मुंबई येथे डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर, रिपोर्टींग ट्रस्टी चेअरमन अँड सुभाष जोंजाळे, ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संध्याकाळी 7 वा अभिवादन सभा संपन्न झाली, प्रथम राष्ट्रीय उपाध्यक्ष व बौद्ध महासभा भिख्खु संघ प्रमुख भन्ते बी संघपाल महाथेरो यांनी त्रिसरण पंचशील दिले व सभेचे सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख अँड एस के भंडारे यांनी केले यावेळी ट्रस्टी अनुक्रमे कॅप्टन प्रविण निखाडे, डॉ राजाराम बडगे, अरुण पोळ आणि वरील सर्व राष्ट्रीय, राज्य व प्रदेश पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.







































Saturday, December 7, 2024

"दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या संपन्न – एक प्रेरणादायी प्रवास"





मुंबई (दि.7/12/2024 ) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया केंद्रीय कमिटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज आंबेडकर भवन दादर येथे संपन्न झाली.

संस्थेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. संस्थेचे राष्ट्रीय रिपोर्टिंग ट्रस्टी एडवोकेट सुभाष जंजाळ यांनी अभिवादन सभेस आले असता सांगितले होते की ,'उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जे ठराव मंजूर होतील त्यास माझा पूर्ण पाठिंबा असेल .'असे राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट एस के भंडारे यांनी सभेस सांगितले .संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर एस .एस .वानखेडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले.

संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी कॅप्टन प्रवीण निखाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट एस के भंडारे यांनी सभेस संबोधित केले. संस्थेचे माजी कोषाध्यक्ष राजेश पवार यांनी सन 2019 - 20 या आर्थिक वर्षाच्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश गवई यांनी सन 2020 - 21 व 2021 - 22 या आर्थिक वर्षांच्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. संस्थेचे विद्यमान राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी .तेलतुंबडे यांनी आर्थिक वर्ष 2022 - 23 व 2023 - 24 या आर्थिक वर्षाच्या अहवालाचे वाचन केले.यानंतर संस्थेच्या अजेंड्याप्रमाणे इतर विषयांवर चर्चा झाली चर्चेमध्ये देशभरातून आलेल्या प्रदेश अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या महत्वाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय पदाधिकारी , सर्व राज्य/प्रदेश अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे मेजर जनरल आणि त्यांच्या वरच्या दर्जाचे सर्व अधिकाऱी उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कपुरसिंह हितैषी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव बी.एच गायकवाड, राष्ट्रीय सचिव बी .एम. कांबळे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, समता सैनिक दलाचे हेडक्वार्टर डि.एम.आचार्य उपस्थित होते.


































Thursday, October 10, 2024

"शाखा पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या – प्रभावी नेतृत्वाची गुरुकिल्ली"

 



दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
( भारतीय बौद्ध महासभा)
संस्थापक:बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
संरक्षक: आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन: आद.डाॅ. हरिश रावलिया*
रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन :- आद.ॲड. सुभाष जौंजाळे.



 शाखा पदाधिकारियों की जिम्मेदारीयाँ और कर्तव्य :


संस्था के कार्यकर्ता और पदाधिकारीयों को कामकाज के बारे में जानकारी होना जरुरी है। जिससे कामकाजकी विभिन्नता और विसंगति दूर होकर एकसूत्रता लाने में सहायता मिलेगी, और धम्म कार्य में गती प्राप्त होकर धम्म का प्रचार और प्रसार का कार्य गतिमान करने में योगदान मिलेगा। संपुर्ण भारत में संस्था के माध्यम से

धम्म प्रचार और प्रसार के कामकाज में कार्यालयीन तथा क्षेत्रीय स्तर पर सुव्यवस्था (सुसूत्रता) लाने के लिए दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया के केंद्र से लेकर राज्य, प्रदेश, जिला और तहसिल, शहर, ग्राम / वार्ड आदि शाखाओं के पदाधिकारियों की जिम्मेदारीयाँ और कर्तव्य संक्षिप्त रुप में दे रहे है। उसका कडाई से पालन करके संस्था का कामकाज करना है।

अ) अध्यक्ष

I) शाखा के प्रमुख होते है।

II) शाखा की पूरी जिम्मेदारी।

शाखा की सुव्यवस्था तथा सुसूत्रता ।

IV) शाखा का कार्य वृत्त प्रस्तुत करना ।

V) सभी सभा और कार्यक्रमों की अध्यक्षता निभाना ।

VI) सभी कार्यवृत्तोंपर (प्रोसिडिंग) हस्ताक्षर करना ।

VII) जरुरत पडने पर विशेष सभा का आयोजन करना।

VIII) जरुरत पड़ने पर खर्च करना।

IX) अपने अधीन शाखा के कार्यकारिणीयों में परिवर्तन (बदलाव) / नियुक्ति आदि करना ।

X) केंद्र / मध्यवर्ती शाखा से सोपे गये सभी कार्य करना।

आ) उपाध्यक्ष

I) सौपे गये प्रभाग के प्रमुख की निम्मेदारी संभालना।

II) प्रभाग का कार्य वृत्त और धन राशी का जमा खर्च (लेखा - जोखा) वृत्त तयार करना।

III)प्रभाग के सभी, सभाओं की अध्यक्षता निभाना।

IV) अध्यक्ष की अनुपस्थिति में सौंपा गया उनका काम करना।

V) केंद्र / मध्यवर्ती शाखा से सौंपे गये सभी कार्य करना।

इ) महासचिव

I) शाखा का सभी पत्राचार करना ।

II) शाखा के सभी सभा और कार्यक्रमों का कार्यवृत्त तयार करना।

III) शाखा का हिसाब बराबर रखना। (कॅश बुक की जिम्मेदारी)

IV) अध्यक्ष के अनुमती से सभी तरह की सभाओं / बैठकों का आयोजन करना।

V) सभी कार्यक्रमो और बैठक का सूत्रसंचालन करना।

VI) सचिव और कोषाध्यक्ष से कामकाज संपन्न करवाना।

VII) वित्तीय वर्ष का लेखा जोखा विवरण का हिसाब तैयार करके निर्धारित समय में मध्यवती शाखा कार्यालय में पेश करना।

VIII) केंद्र या मध्यवर्ती शाखा और अपनी शाखा से जो निर्णय उन्हें आदेश निर्गमित होते हैं, उन्हें कार्यान्वित करना। 

IX)लेखा परिक्षक तथा सनदी लेखाकार से ऑडिट (लेखापरिक्षण) करवाना। 

X) शाखा का दप्तरी कामकाज पुरे जिम्मेदारी के साथ निभाना।

XI) केंद्र / मध्यवर्ती शाखा से सौपे गये सभी कार्य करना।

ई) कोषाध्यक्ष

I) शाखा की धन राशी दर्ज तथा बैंक में जमा करना।

II)शाखा की जमा राशी और खर्च का हिसाब रखना। 

III)शाखा के खर्च के लिए जरुरत पडने पर राशि देना।

IV) महासचिव की अनुमतिसे और मार्गदर्शन से कार्यालयीन कामकाज करना ।

V)पदाधिकारी और अन्य कार्यकर्ताओं से हिसाब लेना, दर्ज करना आदी कामकाज करना।

उ) कार्यालयीन सचिव

1) महासचिव को मदद करना। महासचिव की सलाह और मार्गदर्शन से उनका कार्यालयीन काम आदी कामकाज करना।

ऊ) सचिव

I) प्रभाग के कार्यालयीन कामकाज की पूरी जिम्मेदारी संभालना ।

II) प्रभाग की बैठक और कार्यक्रमों का कार्य वृत्त लिखना।

III) प्रभाग का हिसाब बराबर रखना।

IV) प्रभाग का वित्तीय लेखा जोखा विवरण शाखा को पेश करना।

V) प्रभाग के कार्यालयीन कामकाज महासचिव की अनुमती से और मार्गदर्शन पर करना ।

VI) महासचिव के कामकाज में मदद करना।

VII) महासचिव के अनुपस्थिति में उनका कामकाज देखना आदी कार्य करना।

लेखा परिक्षक

I) शाखा की लेखा परीक्षा करना।

II) हिसाब में कुल त्रुटि या गलतियाँ हों तो शाखा अध्यक्ष और महासचिव के समक्ष रखकर दुरुस्त करवा लेना।

III) शाखा के वित्तीय वर्ष का लेखा जोखा विवरण तैयार करने में मदद करना।

VI) जरुरत पड़ने पर शाखा के हिसाब की चूटियाँ तथा गलतियाँ शाखा कार्यकारिणी, मध्यवर्ती शाखा तथा केंद्रीय कार्यालय को सुचित करना।

ऐ) संगठक

I) नई शाखा निर्मिती के लिए व्यापक जनसंर्षक रखना।

II) संस्था के कार्यक्रमों की तथा नीति की जानकारी आम जनता को देना।

Ⅲ) शाखा की सभी बैठकों और कार्यक्रमों को उपस्थित रहकर जानकारी लेना।

IV) संगठन मजबूत करना।

उपरोक्त पदाधिकारियों की संक्षिप्त जिम्मेदारीयाँ और कर्तव्य पूरी लगन के साथ जानकर संस्था के धम्म प्रचार एवं प्रसार के कार्य में तन, मन और धन से योगदान दें ताकि बोधीसत्व डा. बाबासाहेब अम्बेडकरजी का "भारत बौध्दमय" करने का संकल्प पूरा करने मे आपका भी योगदान मिल सके।

 शाखा के प्रभागों का कामकाज :

संस्था के चारों प्रभागों का कामकाज का संक्षिप्त विवरण निम्न प्रकार हैः-

अ) संस्कार प्रभाग

1) संस्कार प्रभाग की स्टेशनरी का हिसाब रखना।

11) संस्कार प्रभाग से संबंधित सभी शिविर और कार्यक्रमोंका प्रस्ताव तैयार करना।

III) भविष्य में आनेवाले कार्यक्रमों का नियोजन करना।

IV) बौध्दाचार्य, भूतपूर्व श्रामणेर, केंद्रीय शिक्षक, पदाधिकारियों में समन्वय और धम्म प्रचार हेतू कार्यक्रमों का आयोजन करना।

V) केंद्र / मध्यवर्ती शाखा से सौंपे गये सभी कार्य करना।

आ) महिला प्रभाग

I) महिला प्रभाग की स्टेशनरी का हिसाब रखना।

II) महिलाओं में समन्वय तथा विकास के लिए धम्मप्रचार, प्रसार हेतु शिवीर और कार्यक्रमों का प्रस्ताव तैयार करना।

III) प्रभाग की स्टेशनरी का हिसाब रखना।

IV) केंद्र / मध्यवती शाखा से सौंपे गये सभी कार्य करना।

इ) प्रचार - पर्यटन प्रभाग

I) प्रचार-पर्यटन प्रभाग की सभी स्टेशनरी का हिसाब रखना।

II) विविध पर्यटन - धार्मिक स्थलों का दर्शन-सहल (धम्मयात्रा) का आयोजन करना।

III) शाखा वार बौध्दों की जनसंख्या और बुध्द विहारों की संख्या आदि की पूरी जानकारी का संकलन करना।

IV) धम्म प्रचार - प्रसार हेतू उपयुक्त उपक्रम लेना आवश्यक होतो उस का प्रस्ताव तैयार करके अध्यक्ष / महासचिव को सादर करना।

V) संस्था के सभी कार्यक्रम के हैंडबिल्स, पोस्टर्स और समाचार आदि तैयार करना और उनका बँटवारा करना।

VI) केंद्र / मध्यवर्ती शाखा से सौपे गये सभी कार्य करना।

ई) संरक्षण प्रभाग (समता सैनिक दल)

I) दल की स्टेशनरी का हिसाब रखना।

II) सैनिकों में समन्वय रखने के लिए विविध कार्यक्रमों का आयोजन करना।

III) मुख्यालय / मध्यवर्ती शाखा से दल साहित्य उपलब्ध करके सैनिकों को वितरित करना।

IV) भविष्य में आयोजित किये जानेवाले कार्यक्रम, परेड, डयूटी कार्यक्रम निश्चित करना।

V) केंद्र / मध्यवर्ती शाखा से सौपे गये सभी कार्य करना।

आमसभा (वार्षिक सर्वसाधारण सभा) और सम्मेलन (अधिवेशन) :

अ) (बैठक) :

1) राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक कम से कम तीन महिने में एक बार होगी। संविधान के अनुसार आवश्यक निर्णय लिए जाएंगे। यह बैठक राष्ट्रीय अध्यक्ष की अध्यक्षता में या उन्होंने नियुक्त किये (निर्देश दिये) गये पदाधिकारी की अध्यक्षता में होगी।

सभी केंद्रीय पदाधिकारियों के कामकाज का जायजा लेने के लिए राष्ट्रीय

(1) महासचिव हर माह में मासिक बैठक लेंगे। 

2 )संस्था के कार्य के लिए हर एक शाखा अपने स्तर पर हर महीने मासिक बैठक का आयोजन करेगी।

3)संस्था की शाखा का निर्णय केवल शिफारिश समझी जाएगी।

4) लिखित अनुरोध के अनुसार १/३ पदाधिकारी विशेष बैठक की माँग कर सकते है, किन्तु ऐसे निवेदन की दो प्रतियाँ केंद्र को भेजना जरुरी है।

5)केंद्र एक महीने के अंदर बैठक बुलाने का आदेश देगा। केंद्र ऐसी बैठक को निरीक्षक भेज सकते है।

6) सभी प्रश्न, उपस्थित पदाधिकारियों के बहुमत से सुलझाये जाएंगे। अध्यक्ष / केंद्रीय निरीक्षक का निर्णय अंतिम रहेगा। लेकिन निर्णय के विरुध्द शिकायत होने पर केंद्र / मध्यवर्ती शाखा के पास ले जा सकते है। केंद्र का निर्णय बंधनकारक तथा अंतिम रहेगा।

आ) वार्षिक आमसभा / साधारण सभा (AGM)

1) संस्था के सभी सभासदों की वार्षिक आमसभा कामकाज का वर्ष पूरा होने के बाद VIII (एल) (७) के अनुसार आयोजित करना अनिवार्य है। केंद्र की आमसभा जुलाई / अगस्त या राष्ट्रीय अध्यक्ष के आदेश के अनुसार होगी।

1) इस सभा की सुचना कम से कम १५ दिन पहले प्रस्तुत करना आवश्यक है। इस सभा में, निम्न कामकाज होगा।

क) पिछले वर्ष का वार्षिक आमसभा या विशेष आमसभा का कार्यवृत्त का वाचन करना तथा कार्य की समीक्षा करना।

ख)शाखा द्वारा प्रस्तुत किया गया और सी. ए. द्वारा आडिट किया गया वार्षिक लेखा-जोखा, तुलनपत्र को मंजूरी देना। ग) आगामी वर्ष का कामकाज, कार्यक्रम, अर्थसंकल्प प्रस्ताव को मंजूर करना। 

घ) कार्यकारिणी का कार्यकाल समाप्त होने पर कार्यकारणी की नियुक्ती करना।

(मध्यवर्ती शाखा या केंद्र के निर्देश पर)

ज) अध्यक्ष की अनुमती से आने वाले अन्य विषय और धम्म कार्य गतिमान होने के लिए विधायक सूचना ।

प्रोबेशन पर रहनेवाले सभी पदाधिकारी आमसभा को उपस्थित नहीं रह सकते।

IV) शाखाएँ और उनकी आमसभा के सदस्य (General Council)

केंद्र: राष्ट्रीय कार्यकारिणी, सभी केंद्रीय प्रभाग के पदाधिकारी और सदस्य, राष्ट्रीय संगठक, राज्य संगठक, प्रभागीय सचिव, प्रभागीय संगठक और सभी राज्य / प्रदेश, जिला शाखाओं के अध्यक्ष, महासचिव तथा समता सैनिक दल के सभी मेजर जनरल और उनके ऊपरकी रैंक के अधिकारी

राज्य : राज्य, कार्यकारिणी, राज्य संगठक, प्रभागीय सचिव, प्रभागीय संगठनकर्ता, सभी जिला के अध्यक्ष, संगठक, केंद्रीय शिक्षक

प्रदेश : प्रदेश कार्यकारिणी, राज्य संगठक, प्रभागीय सचिव, प्रभागीय संगठक, सभी विभाग (झोन) तथा वार्ड, (नगर) के अध्यक्ष, महासचिव, केन्द्रीय शिक्षक,

जिलाः तहसिल कार्यकारिणी, सभी ग्राम शाखा के अध्यक्ष, महासचिव, केंन्द्रिय शिक्षक, सक्रिय सदस्य, आजीव सदस्य

शहर : शहर कार्यकारिणी, सभी वार्ड (नगर) शाखा के अध्यक्ष, महासचिव, केन्द्रिय

शिक्षक, केन्द्रिय शिक्षिका, सक्रिय सदस्य, आजीवन सदस्य

ग्राम/वार्ड ग्राम/वार्ड (नगर) कार्यकारिणी, केन्द्रिय शिक्षक, केन्द्रिय शिक्षिका, सक्रिय सदस्य, आजीवन सदस्य, सर्वसाधारण सदस्य

इ) सम्मेलन (अधिवेशन)

संस्था के प्रत्येक शाखा में निम्न साल सम्मेलन (अधिवेशन) संपन्न करना होगा।

केंद्र : ५ साल

राज्य/प्रदेश, जिलाः३ साल

तहसील/शहर : २ साल

















Wednesday, October 9, 2024

कालाम सुत्त

 



कालाम सुत्त 

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या मुलुंड शाखेत वर्षावास प्रवचन मालिका संपन्न झाली.केंद्रीय शिक्षिका दिप्ती ताई लोखंडे यांनी दि.6/10/2024 रोजी कालाम सुत्त या विषयावर पुढील प्रमाणे प्रवचन दिले.

तथागत भगवान बुद्धांची कल्याणकारी शिकवण गावा- गावात पसरु लागली होती. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी श्रेष्ठी आणि ब्राह्मण त्यांच्याजवळ येत होते. असेच एकदा भगवान बुद्ध केसमुत्ती नावाच्या गावाला गेले असता, त्या गावातील कालामांनी भगवान बुद्धांना योग्य तो उपदेश करावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले ..

" 'एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन, मा दिठ्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ - 'इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्जुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती"ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ। "

मराठी अर्थ

१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.

२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.

३. हि गोष्ट आमच्या धर्म ग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.

४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.

५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.

६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.

७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.

८. सांगणारा श्रेष्ठी किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका .

तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आपले हित होईल, आपल्याला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले की हे कुशल आहे, ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.

जर तर्कच सर्वश्रेष्ठ असता तर भगवान बुध्दांना उपदेश करण्याची आवश्यकता काय असती ?

प्रत्येक गोष्ट तर्कावर सुटु शकत नाही. आणि सत्यही तर्काच्या बळावर गवसणार नाही. या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या बुद्धीचे लोक राहत असतात जर प्रत्येक जण आपापल्या तर्कावरच विश्वास ठेवायला गेला तर जगातुन सत्य नाहीसे होईल. अंधविश्वासही वाढेल

चांगल्या मनुष्याचा तर्क चांगला तर वाईट मनुष्याचा तर्क वाईटच असेल. परंतु सत्यापेक्षा ते वेगळेच असेल. ज्याचे त्याचे तर्क ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसारच असतील शिवाय आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे की, सामान्य मानवाचे इंद्रिय हे मर्यादीत असतात. प्रत्येक गोष्ट ते त्याच्या तर्कावर सोडवू शकणार नाहीत. (उदा. मानवाचे कान अल्ट्रासोनीक साऊंड ऐकु शकत नाहीत., तसेच कित्येक सूक्ष्म जीव आपल्या डोळ्याने तो पाहु शकत नाही, हे सर्व मानवाच्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत.)

या सर्वांपेक्षाही बुद्धांचा धम्म इंद्रिय मानतात ते म्हणजे आपले मन. सामान्य मानवाच्या मनाचीही शक्ती इतर इंद्रियांप्रमाणे मर्यादीत आहे. त्यामुळे केवळ तर्कावर तो सत्याचा शोध लावु शकणार नाही. मनाची शक्ती वाढविण्यासाठी एक मार्ग सांगितला आहे. त्याने असा कुठेही दावा केला नाही की त्याचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे. परंतु त्याचा हा धम्ममार्ग एकमेव मध्यम मार्ग आहे एवढे मात्र नक्की.

" बुद्ध हे मानवाचेच विकसीत रुप आहे. मानवाच्या मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्धत्व होय. "

भगवान गौतम बुद्धांनी जे काही सांगितले ते सर्वकाही स्वतःच्या अनुभवातुन, तर्कावरुन नव्हे.! आणि त्यांचा असा दावा आहे की कोणीही हा सिद्धांत स्वतः अनुभवुन पाहु शकतो.

यावेळी मुलुंड शाखेचे अध्यक्ष आयुष्मान सुरेश उघडे सरचिटणीस सिद्धार्थ तपासे कोषाध्यक्ष रेखाताई रोकडे व शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.विमलताई सोनवणे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला.

नमोबुध्दाय ! जयभीम








ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...