विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन
आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. या मालिकेतील विशेष प्रवचन “विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध” या विषयावर दिनांक ३१ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी संपन्न झाले. प्रवचनकार म्हणून केंद्रीय शिक्षक व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय डॉ. राजेश पवार गुरूजी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी “विश्वगुरु कसा असावा?” या विषयावर सखोल विचार मांडले. सत्य, करुणा, अहिंसा, समता, विज्ञाननिष्ठ विचार, शांती व बंधुत्व हे विश्वगुरुचे गुण असल्याचे सांगून, भगवान बुद्ध हेच खरे विश्वगुरु आहेत, असा ठाम संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. भरत कडू तायडे यांनी भूषविले. सरचिटणीस आयु. काशिनाथ अनाजी ढोले यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशासाठी योगदान देणारे पदाधिकारी व कार्यकर्ते: संरक्षण सचिव : आयु. बाजीराव काशिनाथ चंद्रमोरे. प्रचार व पर्यटन सचिव : आयु. शाम पांडूरंग पगारे.कार्यालयीन सचिव : आयु. गजानन त्रंबक मेढे. हिशोब तपासनीस : आयु. उत्तम तुक...











Comments
Post a Comment