Friday, August 16, 2024

लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला ! संविधान पुढील शेकडो वर्षे अबाधित राहो !! -डॉ.भीमराव य. आंबेडकर

🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞

मुंबई /ठाणे -  भारतीय संविधान सक्षम नसते, तर देशात बांगला देशासारखी अराजकता झाली असती. मागील दहा वर्षे आणि पुढील पाच वर्षे SC, ST साठी धोक्याची घंटा होती. परंतु संविधानाला न मानणारे सत्तेत आले. त्यांनी चारशे पार ची घोषणा करून, संविधान बदलण्याची भाषा केल्याने, SC, ST,बहुजनांच्या भावना दुखावल्या, संविधानाला खुले आम आव्हान दिले.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला, इंडिया गटबंधनचा नाही ! जे सत्तेत बसले आहेत, ते EVM च्या माध्यमातून बसले आहेत, जनतेच्या माध्यमातून नाही ! तर पाच कोटी मतांचा घोटाळा झाला आहे, असे सारांशाने प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांनी दि. 15/8/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर मुंबई आणि शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल), उल्हासनगर  येथील भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा शाखेच्या 37 वा वर्धापन दिन या कार्यक्रमात केले. डॉ. भीमराव य. आंबेडकर  पुढे म्हणाले की,आम्ही बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीसाठी कटीबद्ध आहोत ! आमच्याबरोबर SC, ST, OBC आहेत, ते धर्मांतर करीत आहेत. बौद्ध संघटना काय करीत आहेत ? याकडे विरोधकांचे लक्ष आहे. गेले दहा वर्षे धम्म दीक्षा कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विविध कायदे केले.

धर्मांतराची संविधानात थेट तरतूद आहे. पण आता जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे धर्मांतरावर मर्यादा आणल्या आहेत. लोकांना पाखंडवादा पासून मुक्ती मिळायला पाहिजे. आंध्र, तेलंगाणा इत्यादी राज्यात लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवटच्या म्हणजे धम्म क्रांती चे अनुसरण करत नाहीत ! त्यासाठी आपण तिकडे लक्ष दिले पाहिजे ! 

     तसेच नागपूरची दिक्षा भूमी ही ऊर्जा स्त्रोत व प्रेरणा भूमी आहे. त्यावर मनुवादींचा कब्जा आहे. विकले गेलेले लोक दिक्षा भूमी समितीत आहेत. आता दिक्षा भूमी आम्ही वाचविली आहे !  ती दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ची आहे. येणाऱ्या अशोका विजयादशमी ला आमचा  कार्यक्रम सर्व लोक व भिक्खुंसह असेल, असे सांगून, आम्ही राजकारण करणार नाही, पण मतदार असल्याने कुणाला सत्तेत बसवायचे,  हे ठरविणार ! असे सांगितले.

      चैत्यभूमी, दादर येथील ध्वजारोहण ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी समता सैनिक दलाची मानवंदना झाली. या प्रसंगी भन्ते धम्म रतन  (दिल्ली ), भन्ते विशुद्धी बोधी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस. के. भंडारे, महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष भिकाजी कांबळे, मुंबई प्रदेश शाखा अध्यक्ष विलास वानखडे, मुंबई प्रदेश महिला शाखा अध्यक्ष वैशालीताई अहिरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. समता सैनिक दलाचे अशोक कदम, डी एम आचार्य, प्रदीप कांबळे, चंदाताई कासले,रविंद्र इंगळे इत्यादी अधिकारी व सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेशचे सरचिटणीस दयानंद बडेकर व आभार प्रदर्शन मुंबई प्रदेश शाखेचे कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर यांनी केले.

     त्यानंतर दुपारच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया, ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख  एस. के. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ जगदीश गवई,राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव बी.एच.गायकवाड, राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख अॅड. डॉ. एस. एस.  वानखडे, राष्ट्रीय सचिव वसंत पराड,महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष भिकाजी कांबळे,महाराष्ट्र राज्य महिला शाखा  सरचिटणीस चंदाताई कासले यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी जिल्हा शाखा अध्यक्ष विजय गायकवाड होते. या कार्यक्रमासाठी पुज्य भंते धम्म प्रिय जी,  राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी.तेलतुंबडे, राष्ट्रीय सचिव राजेश पवार, केंद्रीय सदस्य एम.डी.सरोदे, केंद्रीय  प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रियाताई कासारे, समता सैनिक दल हेड क्वार्टर सचिव डी. एम. आचार्य, केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव अनिल मनोहर, केंद्रीय महिला विभाग सचिव भारतीताई शिराळ, महाराष्ट्र राज्य शाखेचे संस्कार उपाध्यक्ष यु.जी. बोराडे, प्रचार / पर्यटन उपाध्यक्ष डी टी सोनवणे, महाराष्ट्र राज्य महिला शाखेच्या कोषाध्यक्षा सुनंदा ताई वाघमारे, महाराष्ट्र राज्य शाखा सचिव रमेश शिराळ, पालघर जिल्हा शाखेचे संघटक भालचंद्र गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष अनुक्रमें के.बी.हंडोरे, के.पी.गायकवाड, ए. जी. तायडे, अशोक गमरे हे विशेष उपस्थित होते. 

       यावेळी दरवर्षीच्या प्रथेनुसार जिल्हा शाखेचा जमाखर्च व कार्य अहवाल सरचिटणिस प्रभाकर सुर्यवंशी यांनी जाहीर वाचून दाखविला. त्याच बरोबर 1 वर्ष पूर्ण केलेल्या ठाणे जिल्हा महिला शाखेचा सुद्धा जमाखर्च, कार्य अहवाल सरचिटणिस निर्मला ताई कांबळे यांनी  सादर  केला. 37 व्या वर्धापन निमित्त समता सैनिक दलाच्या बँड पथकाचे उदघाटन डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आदर्श तालुका, आदर्श बौद्धाचार्य, आदर्श के़द्रीय शिक्षक, आदर्श केंद्रीय शिक्षिका, आदर्श पुरुष  कार्यकर्ता, आदर्श महिला कार्यकर्ता, आदर्श सैनिक, जेष्ठ बौद्धाचार्य , जेष्ठ केंद्रीय शिक्षक, जेष्ठ केंद्रीय शिक्षिका, महान दानदाते, सैनिक कल्याण निधी दानदाते असे विविध पुरस्कार देण्यात आले. या वर्धापन दिन कार्यक्रमास पुरुष, महिला व सैनिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.






























Friday, August 9, 2024

"चंद्र बोधी पाटील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे चेअरमन नाहीत – सत्य माहिती जाणून घ्या"



चंद्रबोधी पाटील ट्रस्टी चेअरमन नाहीत.


डॉ भीमराव य आंबेडकर यांचे आयु. चंद्रबोधी पाटील यांच्या दि. 21/7/2024 रोजीच्या ज्ञापनला जाहीर उत्तर.

मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियात अनेक वर्षे अध्यक्ष/चेअरमन पदाचा वाद होता. मीराताई आंबेडकर आणि पी. जी. ज्योतीकर यांच्या नंतर, दोन्ही पक्ष रावलिया / चंद्रबोधी पाटील आणि आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतला की, कोर्ट कचेऱ्या पासून अलिप्त राहायचे, वेळ, पैसा खर्च होणार नाही, एकत्र धम्म कार्य करू या ! त्यानुसार एकत्र आलो, परंतु त्यांनी एकता मोडण्याचीच कार्यवाही केली. उदा. घरी बसून परस्पर नियुक्त्या करणे, कमिटी बरखास्त करणे इत्यादी करुन मला विचारल्याशिवाय काहीही करायचे नाही, असे सुनावणे, संस्थेची (मीराताई युनिट) जिथे मालमत्ता आहे तेथे अडचणी निर्माण करणे, चेअरमन शिवाय परस्पर ट्रस्टीची बैठक बोलावणे, पत्र व्यवहार करणे, एवढेच नाही तर त्यांनी दि. 29/7/2023 च्या पत्रान्वये, ज्यांनी 45 वर्षे संस्थेचे अध्यक्ष पद भुषवून संस्था व धम्म देशभर रुजवला त्या संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया, ट्रस्टी/कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  डॉ. भीमराव य. आंबेडकर आणि ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे यांनाच पदावरून दूर करून एकत्रिकरणाला तिलांजली दिली. 

1)या सर्व पार्श्वभूमीवर नाईलाजाने, मुंबई केंद्रीय कार्यालयात दि. 2/8/2023 रोजी केंद्रीय बैठक संपन्न झाली. त्यामध्ये चंद्रबोधी पाटील यांनी संरक्षक -महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन-डॉ. हरीश रावलिया, ट्रस्टी/कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  डॉ. भीमराव य. आंबेडकर आणि ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे यांच्या विरुध्द केलेल्या कारवाईमुळे कार्यकर्ते व जनतेमध्ये प्रचंड असंतोष, चीड निर्माण झालेली असल्यामुळे चंद्रबोधी पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येऊन, मीराताई युनिटमध्ये कोणतीही ढवळाढवळ, मनमानी केली, तर होणाऱ्या  परिणामांना  चंद्रबोधी पाटील स्वतः जबाबदार राहतील व  यापुढे त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लेटर हेडवर असणार नाही, असेही  एकमताने ठरविण्यात आले.

2) त्यानंतर संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावल‍िया यांनी संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीची दि. 24/8/2023 व दि. 5/9/2023 रोजी बैठक डॉ. आंबेडकर भवन, दादर येथे बोलाविण्यात आली. त्यानुसार आयु. चंद्रबोधी पाटील आणि इतर तीन यांना ट्रस्टी पदावरुन कमी करण्यात आले. तसेच ॲड. सुभाष जौंजाळे (ट्रस्टी चेअरमन) यांनी चंद्रबोधी पाटील यांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीमुळे व डॉ. भीमराव य. आंबेडकर यांना  विश्वासात न घेता त्यांचेबरोबर एकत्रिकरण केले असल्याचे निदर्शनास आल्याने आयु. चंद्रबोधी पाटील यांना संस्थेच्या कामकाजातून बेदखल करण्यात आले.

3)धर्मदाय आयुक्त, बृहन्मुंबई यांना जा.क्र. BSI/CC/MUMBAI/07/2024 दि. 19/1/2024 अन्वये संस्थेच्या ट्रस्टीची बैठक बोलविणे, पत्र व्यवहार करणे इत्यादी बाबतचे सर्व अधिकार ट्रस्टी चेअरमन यांना असून त्याप्रमाणे कार्यवाही होतांना दिसून येत नाही. केवळ ट्रस्टी असलेले आयु.चंद्रबोधी पाटील यांनी परस्पर बैठका घेणे, पत्र व्यवहार करणे, नियुक्त्या करणे इत्यादी बाबी ट्रस्टी चेअरमन यांच्या संमतीशीवाय व सर्व ट्रस्टीच्या बैठकीशिवाय केलेल्या आहे. ते सर्व बेकायदेशीर आहे व आयु. चंद्रबोधी पाटील यांनी दि. 31/5/2022 नंतर केलेले सर्व पत्रव्यवहार/प्रस्तावांचा विचार करु नये असे कळविलेले आहे. तसेच सदर पत्राची प्रत चंद्रबोधी पाटील यांना दिलेली आहे.

4)ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावल‍िया व ट्रस्टी / राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांनी प्रसिध्दी पत्र जा.क्र. BSI/CC/MUMBAI/15/2024 दि. 14/2/2024 अन्वये, दि. 31/5/2022 रोजीची हैदराबाद (तेलंगणा) येथील ट्रस्टी, केंद्रीय कार्यकारिणी, विविध राज्याचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांच्या संयुक्त मिटींगमध्ये सर्वानुमते डॉ. हरीश रावलिया यांचा ट्रस्टी चेअरमन पदाचा कार्यकाळ 5 वर्षे वाढविणे, ट्रस्टी बैठक केवळ ट्रस्टी चेअरमन यांनी बोलविणे, संस्था व्यवस्थापन बाबतचे सर्व अधिकार ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांना देणे इत्यादी निर्णय घेतले, त्यानुसार, आयु. चंद्रबोधी पाटील व आयु. शंकर ढेंगरे यांना विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) मधील दि. 26/2/2024 रोजी बैठक बोलविण्याचा अधिकार नसल्याने सदरची मिटींग बेकायदेशीर आहे, असे कळविलेले आहे. (तरी सुध्दा त्यांनी अनधिकृतपणे बैठक घेतली असून, सदर बैठकीस 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित नव्हते.)

5) सन 1982 साली नागपूर दिक्षाभूमीचे पूर्वीचे ट्रस्टी व तत्कालीन सभापती यांच्या आर्थिक सहयोगाने एस. व्ही. रामटेके आणि सहकारी यांनी मीराताईंना विरोध केला. 1982 पासून ते आजपर्यंत बौध्दधम्माच्या चळवळीचे नुकसान केले. कोर्ट केस यामुळे धम्मकार्यासाठी श्रम, पैसा, वेळ गेल्याने धम्माच्या चळवळीला अडथळे निर्माण केले. चंद्रबोधी पाटील हे त्यांचेच  प्रतिनिधी आहेत.

6)दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या आमच्या मीराताई युनिटने देशभर 27 राज्य/प्रदेश शाखा निर्माण केल्या असून, संस्थेच्या 24 प्रकारच्या धम्म प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून बौध्द सदस्य, सक्रिय बौध्द सदस्य, आजीवन बौध्द सदस्य,  केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, बौद्धाचार्य, समता सैनिक दल - सैनिक, वार्षिक शिबीर गॅझेट, वार्षिक सैनिक शिबीर गॅझेट असे संपूर्ण लेखाजोखाचे वार्षिक गॅझेट दि. 21/7/2024 रोजी चैत्यभूमीमध्ये प्रकाशित केलेले आहे. त्याप्रमाणे आयु. चंद्रबोधी पाटील यांनी 34 वर्षाच्या कालावधी मधील लेखा-जोखा बौध्द जनतेला द्यावा की, ज्याच्यावरुन त्यांचे कार्य लोकांना समजून येईल ! 

7) आमचा संपूर्ण देशभर (महाराष्ट्रातील 58 जिल्हा शाखा व देशातील 27 राज्य शाखामध्ये) वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा कार्यक्रम होत आहे. चैत्यभूमीमध्ये आषाढ पौर्णिमा दि. 21/7/2024 पासून ते आश्विन पौर्णिमा दि. 17/10/2024 पर्यंत 30 प्रवचन मालिकेचा कार्यक्रम सुरु केलेला आहे. आयु. चंद्रबोधी पाटील वर्षावासाचा कार्यक्रम घेत नाहीत. त्यांचा यावर्षीही नाही, याबाबत त्यांनी खुलासा करावा.

8)आयु. चंद्रबोधी पाटील हे नागपूर मधील रहिवासी असून, नागपूर दिक्षाभूमी ही दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची असून सुध्दा त्यांनी त्याबाबत काहीही केलेले नाही. तसेच त्यांच्याकडे चारच कार्यकर्ते असल्याने, त्यांनी नागपूर दिक्षाभूमीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा एकही जाहीर कार्यक्रम केलेला नाही. दीक्षाभूमीसमोर एक स्टॉल लावून बसतात, देशभर त्यांच्याकडे कार्यकर्तेच नाहीत. मागील महिन्यापासून दीक्षाभूमी आंदोलन चालू आहे, द‍िक्षाभुमी सध्या मनुवाद्यांच्या ताब्यात आहे. परंतू आयु. चंद्रबोधी पाटील तिकडे फिरकले सुध्दा नाही. याचा त्यांनी खुलासा करावा.  

9) बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केलेली असून, ते स्वतः पहिले अध्यक्ष राहिले आहेत, याचे भान चंद्रबोधी पाटील यांना आहे काय ? ज्याला जन मान्यता नाही, तो चेअरमन /अध्यक्ष कसा होऊ शकतो ? गल्लीत ओळखत नाहीत, पण दिल्लीचा बॅनर घेऊन फिरतात ! त्यांचे ऑफीस नाही, त्यांच्याकडे संस्थेचे दफ्तर /स्टेशनरी सुद्धा नाही. सन 2000 पासून ते स्वयंघोषित अध्यक्ष, सर्वेसर्वा म्हणून मिरवत आहेत, 2000 ते 2024 या कालावधीमध्ये त्यांनी लाखो रुपयांचा निधी गोळा केलेला आहे. परंतु त्याचा हिशोब त्यांनी दिलेला नाही.मात्र जे खरे धम्म कार्य करतात त्यांना आयु.चंद्रबोधी पाटील अडचण आणत आहेत. ते धम्माचे प्रचारक नसून, मारक आहेत ! अशा लोकांमुळे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नाव उंचावत नसून, खुजे होत आहे ! तसेच बौध्दांची पत खालावली जात आहे, त्यामुळे जनतेने चंद्रबोधी पाटील यांना कोणीही मदत /सहकार्य करू नये आणि आयु. चंद्रबोधी पाटील ट्रस्टी चेअरमन असतील तर त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्या मान्यतेची कागदपत्रे जनतेसमोर उघड करावीत अन्यथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांची दि 29/7/2023 व 21/7/2024 च्या पत्रान्वये म्हणजे दोन वेळा कमी केल्याच्या बदनामीबद्दल त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करावी असा ठराव संस्थेच्या  डॉ आंबेडकर भवन, दादर (पूर्व ),मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात दि. 24/7/2024 रोजी ट्रस्टी व केंद्रीय, केंद्रीय विभाग, महाराष्ट्र राज्य , मुंबई प्रदेश शाखेचे पदाधिकारी यांच्या बैठकीत  करण्यात आला.

10) संस्थेचे देशातील जे कामकाज चालू आहे, ते आयु. चंद्रबोधी पाटील मुळे नाही, तर आम्ही खाली सह्या करणारे आणि आमच्या बरोबरचे हजारो पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते करीत आहोत.

11)धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ट्रस्टी बाबतचे बरेच चेंज रिपोर्ट प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत आयु. चंद्रबोधी पाटील यांना इतरांना नोटीस/ज्ञापन देण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी वरीलप्रमाणे मीराताई आंबेडकर व डॉ भीमराव य आंबेडकर यांच्यावर वरीलप्रमाणे दोन वेळा कारवाई केली असल्याचे सोशल मीडिया वर प्रसारित करून डॉ आंबेडकर घराण्याची बदनामी केलेली आहे. त्यामुळे आयु चंद्रबोधी पाटील यांच्या विरुद्ध आंबेडकरी समाजात, संस्थेच्या देशभर पदाधिकारी /कार्यकर्त्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.त्यांनी प्रसिद्ध केलेले ज्ञापन / मेमोरॅंडम दि 14/8/2024 पर्यंत मागे घ्यावे, अन्यथा आम्ही कायद्यानुसार न्यायालयीन कार्यवाही करू आणि त्याच्या खर्चाची व परिणामाची संपूर्ण जबाबदारी चंद्रबोधी पाटील यांच्यावर राहील याची त्यांनी नोंद घ्यावी.असे प्रसिद्धी पत्रक /नोटीस पत्रक द्वारे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर ( ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ), डॉ हरीश रावलिया (ट्रस्टी चेअरमन ), कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव ), एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष /मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ), अँड डॉ एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) यांनी आयु. चंद्रबोधी पाटील यांना  व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या देशभरातील सर्व शाखांना पाठविले आहे.

Monday, August 5, 2024

डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांची भुमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक किरण कांबळे आणि माझी भेट.

 



मुंबई (दि.4/8/2024) आज आंबेडकर भवन दादर येथे मला भेटण्यासाठी दानशूर चित्रपटाचे दिग्दर्शक किरण कांबळे आले होते.पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील लेणी अंबा अंबिका अंबालिका या लेण्यांवर वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आयु.किरण कांबळे साहेब यांची आणि माझी ओळख झाली.दानशूर चित्रपट हा मेडिटेशन वर आधारित आहे.सदर चित्रपट शाळा कॉलेज आणि बुद्ध विहारा मध्ये प्रदर्शित करण्यासाठी माझ्यासोबत चर्चा केली. त्यांचा दानशूर चित्रपट विहारा मध्ये दाखवण्या बाबत चा विषय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आद.एस के भंडारे साहेब यांच्या पर्यंत पोहोचवुन त्यांची भेट घडवून आणण्यासाठी आश्वासन दिले.

या दानशूर चित्रपटाचे विशेष असे कि या चित्रपटात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब याची छोटीशी भूमिका आहे.

आजच्या भेटीत दिग्दर्शक किरण कांबळे साहेब यांनी मला त्रिपिटक ग्रंथ भेट दिला.

या भेटीच्या वेळी राष्ट्रीय सचिव बि.एम.कांबळे मुंबई प्रदेश शाखेचे पदाधिकारी रवींद्र गवई,खाडे गुरुजी उपस्थित होते.



Monday, July 22, 2024

अंबा, अंबिका, अंबालिका व भुत बुद्ध लेणी येथे वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन कार्यक्रम संपन्न

 



दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया
भारतीय बौद्ध महासभा 
संस्था नोंदणी क्रमांक 32 27 विश्वस्त नोंदणी क्रमांक 982 एफ मुंबई .
संस्थापक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
राष्ट्रीय संरक्षक आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर.
ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरेश रावलीया.
ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन एडवोकेट सुभाष जोंजाळे साहेब.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डॉ. भीमराव  आंबेडकर साहेब

=====================================

जिल्हा पुणे पश्चिम  रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी आंबा अंबिका अंबालिका व भुत बुद्ध लेणी जुन्नर येथे वंदना सुत्तपठण घेऊन  समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेंश पवार गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.आदरणीय राजेश पवार गुरुजी यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्त्व आपल्या प्रवचनातून सांगितले. तसेच संस्थेचा कामकाज याविषयी माहिती सांगितली .

भारत बौद्धमय करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धर्म हा ग्रंथ लिहिला आहे. आजच्या भिक्खू संघाच्या रचनेत आणि त्यांच्या ध्येय उद्दिष्टांमध्ये बदल केले पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी 'मी संघाला शरण जाणार नाही' असे म्हटले होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ तर सूत्रसंचालन सरचिटणीस भगवान शिंदे यांनी केले .

 आभार प्रदर्शन संस्कार उपाध्यक्ष अशोक कडलक यांनी मानले

या वेळी जिल्ह पदाधिकारी, तालुका जुन्नर, आंबेगाव, खेड दक्षिण खेड उत्तर, मावळ दक्षिण मावळ उत्तर, देहूरोड या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अधिकारी पदाधिकारी सैनिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुन्नर तालुक्याने विशेष परिश्रम घेतले तर उर्वरित आंबेगाव खेड या तालुक्यांनी सुद्धा चांगले सहकार्य केले.

ज्या निष्ठावंतानी या कार्यक्रमात भाग घेतला त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षण चित्रे खालील प्रमाणे आहेत.















Saturday, July 6, 2024

रायगड दक्षिण जिल्हा शाखेचे कार्यकर्ता /चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न

 



आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा रायगड दक्षिण जिल्हा  शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव  यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे कार्यकर्ता /चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले .

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव राजेश पवार व  महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष व माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष डी टी सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता/चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेश पवार यांनी आजच्या कार्यकर्ता/ चिंतन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले.  कार्यकर्ता/चिंतन प्रशिक्षण शिबिरात ओळख परिचय झाल्यानंतर राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी प्रशिक्षणार्थींची ऑनलाइन पूर्वार्ध चाचणी परीक्षा घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा शाखेचे सरचिटणीस आदरणीय नवनीत साळवी गुरुजी यांनी केले.

आभार प्रदर्शन रायगड जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रदीप मोहिते गुरुजी यांनी केले .

आजच्या कार्यकर्ता /चिंतन शिबिरामध्ये पुढील प्रमाणे विषय घेण्यात आले.

१) प्रशिक्षण शिबिर उद्घाघाटन व परिचय .

2) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ध्येय उद्दिष्टे व मिशन 

3)शाखेचे कामकाज कसे करावे आणि हिशोब कसा लिहावा .

4)कार्यकर्त्याची आचारसंहिता आणि प्रबोधनाची आचारसहिता .

5)पदाधिकाऱ्यांची जबाबदारी 

6)मनोगत 

7)उत्तरार्ध ऑनलाइन चाचणी परीक्षा 

8)अध्यक्षिय भाषण 

9)सरणतय 

माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय  डी टी सोनावणे गुरुजी  यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी होईल या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतीमान कशी करावी? अर्थात बीएसआय मिशन

 पूर्वपीठिका 

प्राचिन वैदिक कालापासून मनुस्मृति नुसार अस्पृश्य स्त्री/पुरुषांना चार वर्णाच्या (ब्राम्हण, श्रत्रिय, वैश्य, शुद्र) स्त्री यांना स्वतंत्र्य, समानता तसेच शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले होते. त्यांना धर्म रुढी परंपरा या नावाखाली गुलामीत ठेवले होते. अस्पृश्यांना कुत्र्या-मांजरा पेक्षाही हिन वागणूक होती. त्यांचा स्पर्श व थुंकिचा विटाळ होत होता म्हणून गळ्यात मडके व पाऊल खुणा दिसू नयेत म्हणून कमरेला खराटा होता. 

डॉ. बाबासाहेब यांची धम्मक्रांती.

जगाचा इतिहास पाहता जगात अनेक क्रांत्या झाल्यात, फ्रांस मध्ये (फ्रेंच राज्य क्रांती) तीन १७८९, १८३० आणि १८४८ च्या क्रांतीने राजेशाही आणि प्राचिन राजवट खाली आणली. त्याचा परिणाम राजा लुई सोळावा आणि त्याची प्रसिध्द पत्नी मेरी ॲंटोइनेट यांचा शिरच्छेद झाला.

प्रबोधनाच्या नवीन कल्पनांनी प्रभावीत होऊन अमेरिकन क्रांती १७६५ ते १७८३ या कालावधीत घडली. युरोपात १८४८ मध्ये गरीब, बेरोजगार आणि उपासमार असलेल्या शेतकरी आणि कामगारांच्या विद्रोहा सह सुशिक्षित मध्यम वर्गाने सुरु केलेल्या विविध राष्ट्रीय चळवळींचा आहे. या सर्व क्रांत्या रक्तरंजीत ठरल्या आहेत.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहिले, संविधानाच्या माध्यमातून चातूवर्णाच्या विषमतेतून मुक्त करून समता प्रस्तापित केली.

उदा. १) समानता (संविधान कलम १४ ते १८) सर्वांना समान वागणूक, कायद्यापुढे समान, धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान यावरुन कोणताही भेदभाव नाही व अस्पृश्यता नष्ट केली आहे.

२) स्वातंत्र्य (संविधान कलम १९ ते २१) व्यक्तिगत स्वातंत्र्य तसेच भाषण, लिखान, भारतात कोठेही फिरणे, राहणे, स्थायीक होणे व व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करणे आणि

३) धार्मिक स्वातंत्र्य (संविधान कलम २५ ते २८) कोणताही धर्म स्वीकारणे व आचरण करणे. 

धार्मिक स्वातंत्र्याचा अंगीकार करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपुर मुक्कामी विषमतावादी हिंदु धर्माचा त्याग करून समतावादी बौध्द धम्माचा स्विकार केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता जागतिक अशी धम्मक्रांती केली आहे.

संविधान व धम्मक्रांती मूळे स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता, न्याय व शिक्षण, नोक-या, अधिकार पदे मिळाली. सामाजिक स्थर उंचावला, विकास, प्रगती झाली. 

धम्मक्रांती मागे घेण्यासाठी विरोधकांची कार्यवाही

संविधानाला हिनवने, संविधान चांगले नाही हा अपप्रचार करणे, संविधानाला गोधडीची उपमा दिली, त्यातील तीन रंग हे अशुभ असल्याचा अपप्रचार करणे.

इथल्या एस.सी / एस. टी. वर अत्याचार करणे, शिक्षणातील आरक्षण संपविणे, शिष्यवृत्ती बंद करणे, खाजगीकरण, उदारीकरण तसेच जागतिकीकरण करणे इत्यादि. देशाच्या नविन संसद भवनाच्या पाया भरणी साठी त्यावेळचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांना बोलावले नव्हते.. तसेच संसद भवनाच्या उद्घघाटन प्रसंगी राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु यांना सुद्धा निमंत्रित केले नाही.

 हिंदुराष्ट्राची संकल्पना अर्थात धर्मावर आधारीत (मनुस्मृती प्रमाणे) नविन संविधान तयार करणे. संविधानातील कलम १५ रद्द करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

संविधानातील कलम २५ नुसार प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य (Right to Religion) तसेच कलम २१ नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्य (Right to choice of an Individual) दिलेले असतांना देखील धर्मांतरातील २२ प्रतिज्ञा वर बंदी घालणे, लव जिहादच्या नावाखाली कर्नाटक, उत्तरप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, ओरिसा, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि हरियाणा या सर्व राज्यात धर्मांतर विरोधी कायदे करण्यात आले आहेत.

मा. गुजरात उच्च न्यायालयाने, गुजरात राज्याचा (The Gujrat Freedom of Religion Act, 2021 ) हा कायदा ऑगस्ट २०२१ मध्ये रद्द केला आहे.

धम्मक्रांती गतिमान करण्याचा संकल्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून व बौध्द धर्मांतर करुन चातुर्वर्णाच्या विषमतेतून, गुलामगिरीतून बाहेर काढले व देशात समता प्रस्थापित केली. त्यामुळे आपण स्वाभिमानी, समतावादी बनून शिक्षण घेऊन नोकऱ्या  मिळविल्या, अधिकार पदे मिळाली, आपली सामाजिक व शैक्षणिक प्रगती व विकास झाला. परंतू समतेचे विरोधक व विषमतेचे पुरस्कर्ते यांना संविधान बदलून धर्मावर आधारित संविधान व राष्ट्र बनवायचे आहे. शिक्षणातील व नोकरीतील आरक्षण संपविण्यात येत आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरण चालू आहे. मागसवर्गीयांवर अन्याय अत्याचार इत्यादीमुळे देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे .त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित भारताचा आदर्श नागरिक बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल)  यांनी २०२४-२५ पर्यंत करोडो लोकांचे धर्मांतर  अर्थात  घरवापसी करण्याचा संकल्प ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपूर येथे केला आहे. 

आठ गोल्डन मार्गाचा अवलंब करावा

संकल्प पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे तथागत भगवान बुध्द यांनी माणसाच्या जीवनात प्रगती होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे ८ गोल्डन पाथ ऑफ लाइफ सांगितलेले आहेत त्याप्रमाणे खालील ८ गोल्डन मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

१. चलो बुध्द की ओर अभियान जातीअंताची चळवळ:

चोवीस पॉइंट प्रोग्राम (शिबीरे) गावागावापर्यंत करणे. बहुजन समाज संघटना, समविचारी संस्था / संघटना सोबत समन्वय साधून धर्मांतर - घरवापसी परिषदा घेणे (इतर धर्मावर टिका टिप्पणी न करता.) धम्म परिषदा, धम्म मेळावे, धम्म रथ गावागावात फिरवणे. राष्ट्रपुरुष राष्ट्रसंत जयंती / पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होणे. 

२. आचारो परमो धम्मो  :

 बौध्द धम्माचे काटेकोरपणे आचरण करणे.

 ३. बुद्धिस्ट आयडेंटिटी (बौध्द की पहचान) निर्माण करणे:

 केवळ जयभीम वाले अशी ओळख न होता संस्कारामधून बौध्द म्हणून ओळख होणे गरजेची आहे. संस्कारामध्ये एकसूत्रीपणा आणने व बौध्द लिखो अभियान (शाळा प्रवेशा वेळी धर्म बौध्द लिहिणे व जातीचा दाखला बौध्द करुन घेणे), बौध्द सभासद बनो अभियान (भारतीय बौध्द महासभेचे सभासद करणे) राबविणे.

४. टिम वर्क करणे :

कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी लिच्छविचे सात नियम पाळून काम करणे. टिमवर्क म्हणजे सर्वांनी मिळून एकत्रित समन्वयाने काम करणे (Total Efforts by All Members), वाद, मतभेद, लावालावी, निंदा, अपमान, इत्यादी न करणे.

५. धर्मांतरीतांच्या बरोबर रोटी-बेटी व्यवहार करणे :

 धर्मांतर झालेल्या व्यक्ती / समाजाबरोबर रोटी-बेटी व्यवहार करणे तसेच त्यांना संघटनेमध्ये योग्य स्थान देणे.

६. बुध्दविहार जोडो अभियान :

बुध्दविहार संस्था / संघटना / यांचेशी समन्वय साधून विविध कार्यक्रम घडवून - आणणे, बुध्दविहार नोंदणी करणे.

७. मंडळ जोडो अभियान : 

समाजातील युवक, महिला, जयंती मंडळे संस्थेबरोबर समन्वय साधून गाव / वार्ड पातळीपर्यंत शाहूवाडी पॅटर्नप्रमाणे शाखानिर्माण करणे. (गाव तिथे शाखा, शाखा तीथे बौद्धाचार्य, एक घर एक सैनिक) 

८. समाजाशी नाळ जोडणे: 

 समाजातील डॉक्टर, वकिल, व्यवसायिक आणि प्राध्यापक, शिक्षक, सरकारी / निमसरकारी / खाजगी अधिकारी इत्यादी जोडो अभियान राबविणे त्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मोफत सहाय्यता व सल्ला केंद्र निर्माण करणे.

जर आपण डॉ. बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी वरील आठ मार्गांचा अवलंब केला नाहीतर पुन्हा पेशवाई येवून गळ्यात मडके व कमरेला खराटा येऊ शकतो (सांकेतिक) त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया.

प्रबोधनाची आचारसंहिता हा विषयावर मार्गदर्शन करताना डी टी सोनवणे गुरुजी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले 

1. प्रबोधन करतांना संस्थेच्या चालू घडामोडी व उपक्रमा बाबतची माहिती जनतेला द्यावी,

जसे सभासद नोंदणी अभियान इत्यादी.

2. प्रबोधनकार हा बौध्दाचार्य, प्रशिक्षित श्रामणेर, प्रशिक्षित अंधश्रध्दा निर्मुलन शिबीर, व्यक्तिमत्व विकास शिबीर, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका शिबीर यामध्ये बसलेला असावा.

3. प्रबोधन / प्रवचन करतांना, विषय मांडतांना महापुरुषांचे वचन सांगतांना भेसळ करु नये. 

4. प्रबोधन करतांना विषय समजून घेणे, विषयाला सोडून बोलू नये.

5. बोलतांना प्रस्तावना खूप लांबलचक नसावी. 

6. सकारात्मक पध्दतीने बोलावे.

7. आपल्या कामामध्ये आणि हिशेबामध्ये पारदर्शकता असावी. 

8. सभागृहामध्ये समोर बघून बोलावे.

9. सामाजिक व धार्मिक भान ठेवून बोलावे. (टीका/ टीप्पणी करु नये, देवाधर्मावर बोलू नये.)

10. कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद राहील असे प्रबोधन करावे.

11. प्रत्येक धम्मप्रचारकाचा विषय लिखित असावा.

12. दिलेल्या वेळेत विषय संपवावा.

13. कार्यकर्त्याने वाचेवर संयम ठेवावा, सम्यक वाचेचे पालन करावे.

14. मार्गदर्शन करतांना किंवा विधी करतांना आपले उच्चार स्पष्ट असावेत. 

15. मार्गदर्शन करतांना स्वत:चा इतिहास, प्रौढी, मोठेपणा सांगत बसू नये.

16. मार्गदर्शकाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म, शुद्र पूर्वी कोण होते ? अस्पृश्य मुळचे कोण ? पाकिस्तानची फाळणी, जातीअंताचा लढा आणि मुक्ती कोण पथे ?, क्रांती आणि प्रतिक्रांती किमान ही पुस्तके वाचावीत.

 राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी हिशोब कसा ठेवायचा या विषयावर पुढील प्रमाणे  मार्गदर्शन केले.

शाखा कार्यालयीन कामकाज व शाखेचा हिशोब

अ) पार्श्वभूमी-

बायलॉज दि. २९/८/२००० च्या वार्षिक सभेमध्ये स्विकृती

प्रकाशन दि. १७/९/२००० (भय्यासाहेब आंबेडकर स्मृती दिन) रोजी चैत्यभूमी येथे आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या हस्ते (बायलॉज समिती दि. २/३/२००० रोजी नियुक्ती, अध्यक्ष एस. के. भंडारे, राष्ट्रीय महासचिव)

ब) बायलॉज

एकुण १० कलमे व ८ परिशिष्ठे त्यामधील कार्यालयीन कामकाजा बाबतची खालीलप्रमाणे माहिती

सारांशाने देत आहोत. कलम VIII कार्यालयीन कामकाज आणि नियम

अ) कामकाज / हिशोबाचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च 

बी) कामकाजाचे दिवस आठवड्यातील कमीत कमी ३ दिवस (गुरुवार, रविवार, पोर्णिमा सोडून) 

सी) १. वरीष्ठ शाखेकडून प्राप्त झालेले पत्र / आदेशानुसार कार्यवाही करीत असले बाबत वरीष्ठ शाखेला कळविणे.

२. सी. आर. संदर्भ (सेंट्रल रेफरन्स) म्हणजेच केंद्राने/राज्याने सुचित केलेल्या पत्र/प्रकरण/तक्रार इत्यादीबाबत १५ दिवसाच्या आत केंद्र/राज्य शाखेला उत्तर/माहिती पाठवावी 

३. लेटरहेड - संस्थेच्या विहित नमुन्या प्रमाणे (परिशिष्ट २ )

४. शिवीर/कार्यक्रम मागणी अध्यक्ष, सरचिटणीस आणि संबंधित विभागाचा उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या वरीष्ठ शाखेला मागणी करणे व त्याची प्रत केंद्रीय प्रशिक्षण विभाग, केंद्रीय कार्यालय प्रमुख यांना पाठवावी.

डी) शाखा पदाधिका-यांचे शिक्के (परिशिष्ट ४) नाव कंसात टाकणे, नाव, पद व संस्थेचे नाव एकाच साईजचे असणे आवश्यक आहे. 

इ) कार्याची माहिती -

१. सरक्युलेशन फाईल - शाखेतील विविध कार्याची हँडबिल, पोस्टर, कार्यक्रम पत्रिका इत्यादीची बॉक्स फाईल सर्वांनी पाहण्यासाठी कार्यालयात ठेवणे

२. एस. ओ. फाईल (स्टँडींग ऑर्डर फाईल)- कामकाज, स्टेशनरी, धम्मदान, साहित्य, नियुक्त्या इत्यादी बाबतचे संस्थेची परीपत्रके, आदेश इत्यादी एकत्र ठेवावे व हि फाईल कधीही नष्ट करु नये, ती नेहमी कार्यालयातील मुख्य टेबलावर असावी.

जी) प्रत्येक जमा रक्कमेची पावती देणे जमा रक्कमेच्या पावतीसाठी भरणा पावती प्रत्येक शाखेने छापने आवश्यक आहे. शिबीर /कार्यक्रमामध्ये जनतेकडून सार्वजनिक पध्दतीने दान प्राप्त झाल्यास रु ५०/-पेक्षा जास्त रक्कमेची पावती देणे आवश्यक आहे.

तसेच दान स्वरुपात मिळालेल्या वस्तूची सुध्दा पावती दिली पाहीजे व त्याचे स्वतंत्र रजिस्टर ठेवावे व त्यामध्ये अथवा पावतीवर त्या वस्तूचा वापर कुठे केला आहे त्याचे एक विवरण किमान दोन पदाधिकारी यांनी प्रमाणित केले पाहिजे. विशिष्ट कार्यासाठी जमा केलेली रक्कमेसाठी स्वतंत्र धम्मदान पावती द्यावी. उदा. बुध्दविहार, महाविहार, भवन, कार्यालय बांधणे इत्यादी

एच) भरणा पावती व धम्मदान पावती छापण्यासाठीची मंजुरी केंद्र देते व त्यांनी दिलेले ऑर्डर नंबर त्या पावतीवर छापने आवश्यक आहे. ज्यांनी विनापरवाना छपाई केली तर त्यांची मध्यवर्ती शाखा/ प्रभारीला जबाबदार धरले जाते.

आय) शाखा बँक खाते - राष्ट्रीयकृत /स्थानिक/शेडयुल्ड बँकेत/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काढावे.. अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यापैकी दोघांच्या स्वाक्षरीने पैसे काढले जाईल. शाखेला जमा झालेली सर्व रक्कम बँकेत जमा करावी व हातात केवळ रु ५००/- शिल्लक ठेवावी.

जे) कॅशबुक/पेटीकॅशबुक ठेवणे  .जमा-खर्चाची प्रत्येक दिवसाची नोंद कॅशबुक (रोज किर्द) ठेवली जाते . व प्रत्येक महिन्याला हातातील व बँकेतील शिल्लक नमूद केल्यानंतर अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. पेटीकॅशबुकमध्ये प्रत्येक शिबीर/कार्यक्रम नुसार जमा-खर्च लिहावा. त्याचा एकुण जमा व खर्च कॅशबुक मध्ये नमूद करावा. अनामत रक्कमे साठी जमा पावती देणे आवश्यक आहे.

के) व्हाउचर (खर्चाचे बिल) परिशिष्ट ५ च्या नमुन्यात प्रत्येक शाखेने छापून घेणे आवश्यक आहे. हे व्हाउचर प्रत्येक बिलावर लाऊन अध्यक्ष / सरचिटणीस / कोषाध्यक्ष व ज्यांनी बिल संबंधितास दिले आहे त्याची/किंवा ज्याने रक्कम स्विकारली आहे त्यांची सही घ्यावी.

प्रत्येक खर्चाचे बिल संस्थेच्या संबंधित शाखेच्या नावावरील आवश्यक (वैयक्तीक पदाधिका-याच्या नावे असू नये)

एल) जमाखर्च अहवाल नमुना (परिशिष्ट ६) च्या नमुन्या प्रमाणे  आवश्यक आहे. 

जमाखर्च अहवाल आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गाव/नगर/वार्ड शाखेने ३१ मे रोजी, - शहर / तालुका शाखेने ७ जून रोजी, जिल्हा शाखेने २१ जून रोजी आणि राज्य / प्रदेश शाखेने ३० जून रोजी मंजुर केल्यानंतरच आपल्या वरीष्ठ शाखेस सादर करावा.

एम) शाखेने ठेवावयाचे दप्तर कॅशबुक (रोजकिर्द), पेटीकॅशबुक, लेजरबुक (खतावणी), मिनिटबुक (प्रोसीडिंग बुक, इतिवृत्त नोंदवही) - कार्यकारीणी बैठकीसाठी व वार्षिक सर्वसाधारण सभा (जनरल बॉडी) सभेसाठी दोन वेगवेगळे आवश्यक, संस्थेकडून आणलेल्या स्टेशनरीचे स्टॉक रजिस्टर, डेडस्टॉक (मालमत्ता) रजिस्टर इत्यादी.

मुख्य शाखा २५ फाईल/रजिस्टर, संस्कार विभाग ४ रजिस्टर, महिला विभाग ३ रजिस्टर, प्रचार पर्यटन विभाग ६ रजिस्टर / फाईल, संरक्षण विभाग (समता सैनिक दल) ४ रजिस्टर / फाईल.

कलम IX - इतर महत्वपूर्ण सुचना व नियम

अ) शाखा कार्यालय प्रत्येक शाखेचे स्वतंत्र कार्यालय घेणे आवश्यक आहे, कार्यकारीणीने कार्यालय • कोठे असेल असे ठरविले नाही तर, सरचिटणीस यांचे घर हेच कार्यालय मानले जाईल.

बी) संस्थेने निश्चित केल्याप्रमाणे धम्मदान देणे/घेणे आवश्यक आहे. (आदेश क्र. ४३/२०२३दि. १९/६/२०२३) 

जी) पदाधिकारी यांची माहिती प्रत्येक वर्षी १५ जूलै पर्यंत देणे आवश्यक आहे.

एच) आरोप / तक्रार कोणतीही तक्रार लेखी स्वरुपात दोन प्रतीमध्ये असावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची एक प्रत तक्रार ज्याच्या विरुध्द आहे त्याला द्यावी. आवश्यक वाटल्यास केंद्र/प्रतिनिधी व्दारे • समोरासमोर चर्चा करुन निर्णय घेऊ शकते.

टिप - सोबत जमा-खर्च अहवालाचा नमुना (परिशिष्ट ६) व खर्चाचे व्हाउचरचा नमुना (परिशिष्ट ५)

मनोगतामध्ये गौतम वाघमारे प्रचार पर्यटन प्रमुख. नवनीत साळवी सरचिटणीस. प्रदीप मोहिते कोषाध्यक्ष. संतोष जाधव सचिव संस्कार विभाग . संदीप साळवी सचिव संरक्षण. संतोष साळवी कार्यालयीन सचिव हिशेब तपासणी चंद्रकांत गायकवाड. दिलीप चाफे संघटक. इत्यादी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

शेवटी रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले तद् नंतर उत्तरार्ध परीक्षा घेण्यात आली सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




























ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...